ऋतू येत होते, ऋतू जात होते
मुकी भैरवी झाड का गात होते?
प्रकाशा मिळावा कसा तो निवारा?
चक्षूच घनघोर तिमिरात होते
अता सोडवावी कुणी रामकांता?
जटायूच सारे विचारात होते
प्रभाती अरुणास का अर्घ्य द्यावे?
तुझे मूर्त लावण्य -सुस्नात- होते
तुटावे - अंतरीचे सारेच बंध
असे काय त्या तव शब्दांत होते?
अकाली फुटावी मना पालवी
तसे ओठ माझेच का गात होते?
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment